Saturday, April 23, 2011

सचिन तुझ्या वाढदिवसानिमित्ताने...


विश्वविजत्या संघाचा सदस्य असल्याचा अभिमान बाळगणारा आंतरराष्ट्रिय कारकीर्दीतील चमकदार २१ वर्षे पूर्ण करणारा विश्वविक्रमादित्य, वंडरबॉय सचिन तेंडुलकर उद्या आपल्या ३८ व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. विश्वविजेत्या संघाचा सदस्य झाल्यानंतर येणारा हा सचिनचा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे आधी झालेल्या वाढदिवसांच्या तुलनेत या वाढदिवसाचा गोडवा काही वेगळाच असणार आहे. सचिनने कराची येथे १५ नोव्हेंबर १९८९ रोजी सुरु झालेल्या कसोटी सामन्यामधून आंतराष्ट्रिय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने १७७ कसोटी सामन्यात ५६.९४ च्या सरासरीने १४६९२ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने ५१ शतके आणि ५९ अर्धशतके झळकाविली आहेत. तर ४५३ एकदिवशीय सामन्यात ४५.१६ च्या सरासरीने १८११ धावा फटकाविल्या आहेत. यामध्ये त्याने ४८ शतके तर ९५ अर्धशतके झळकाविली आहेत. त्याने एकूण ९९ शतके आणि १५४ अर्धशतके साजरे केले आहेत. एवढेच नव्हेतर तो सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या चौथ्या पर्वात सामने खेळत धावांसमवेत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने सुरुवातीपासून ऑरेज कॅप आपल्या कडेच राखली होती. मात्र एकाधावाने पंबाजच्या वल्थॅटीने ती आपल्याकडे घतेली आहे. एवढे करुनही त्याची धावांची भूक क्षमलेली दिसत नाही. यावेळीही त्याला आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम लांबणीवर टाकावा लागण्याची शक्यता वाटते कारण त्याच्या वाढदिवशीच मुंबईला डेक्कनविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याने यावेळी जर मुंबईला आयपीएलच्या चौथ्या सत्राचे अजिंक्य ठरविलेतर ही एक त्याच्या चाहत्यांनाच भेट असेल. त्याला आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. कधी टेनिस एल्बोने पाठीच्या दुखण्याने तर कधी इतरांच्या टीकेने त्याला बेजार व्हावे लागले. मात्र सचिनने कधीही असभ्य वर्तवणुक केली नाही. शरीराच्या त्रासावर मात करीत त्याने कारकिर्दीकशी अधिक फुलेल याकडे लक्ष दिले. तर अनेकांच्या टीकांना त्याने नेहमीच आपल्या बॅटने प्रत्त्युत्तरे दिली आहेत. भारतीय क्रिकेटरसिंकांच्या गळ्यातील ताईत आणि क्रीडा रसिकांच्या दृष्टिने जणू देवच असणार्‍या सचिनचे क्रिकेटसाठीचे असणारे योगदान महत्वाचे आहे. आपल्या या क्रिकेट कारकर्दित सचिनने अनेक विक्रम आपल्या नावार नोंदविले आहेत. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. सचिनला १९९८ साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या राजीव गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याने आपल्या कर्तृत्वाने क्रीडा क्षेत्रातून देशाचे नाव उज्वल कले आहे. वाढत्यावयानुसार त्याची खेळी अधिकाधिक बहरताना दिसते आहे. त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखावे आणि तमाम क्रिकेटरसिंकांना आपल्या खेळी सतत आनंद देत राहावे हीच अपेक्षा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Saturday, February 19, 2011

सोन्याने मढलेला विश्वचषक


शनिवारपासून ढाक्यामध्ये सुरू झालेल्या क्रिकेटच्या विश्वचषक महामेळाव्यात सहभागी झालेले प्रत्येक संघ ११ किलोग्रॅम वजनाच्या सुवर्णजडीत विश्वचषकासाठी झुंज देत आहे. दोन एप्रिल रोजी वानखेड़े मैदानावर जो चकाकणारा चषक असणार आहे तो वास्तविकतेत विश्वचषकाची प्रतिकृती आहे, ज्यामध्ये मागील विजेत्यांची नावे वगळता इतर कोणताही बदल केलेला नाही. सोने आणि चांदीपासून मढविण्यात आलेल्या या विश्वचषकासाठी १४ संघांमध्ये झुंज होत आहे. हा विश्वचषक १९९९ मध्ये गेर्राड ऍण्ड कंपनीच्या कामगारांनी दोन महिन्यांच्या अंतरामध्ये कठोर परिश्रम घेत केला आहे. गेर्राड ऍण्ड कंपनी ब्रिटनच्या शाही कुटुंबाचे ज्वेलर्ससुद्धा आहे. या चषकात महत्त्वाची बाब अशी आहे की, यामध्ये क्रिकेटला पूर्णतः परिभाषित केले आहे. यामध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागाचा खूपच आकर्षक तर्हेने समावेश केला गेला आहे. चषकाची एकूण लांबी ६० सेंटीमीटर आहे. या चषकाला तीन स्तंभांच्या आधारावर वरती सुवर्ण ग्लोब आहे. चषकावर लावण्यास आलेले तिन्ही स्तंभ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांचे प्रतिनिधित्व करतात. याच्या खालच्या भागात विजेत्यांची नावे लिहिली आहेत आणि यात आणखी दहा संघांची नावे बसू शकतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील दहा विश्वचषक स्पर्धेमध्ये या चषकाला कायम करायचे म्हटले तरी असे ते करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे विश्वचॅम्पियन संघाला जो चषक दिला जाईल त्यामध्ये मागील विजेत्यांची नावे नाहीत. आयसीसीने मुख्य ट्रॉफी दुबईमध्ये असलेल्या आपल्या मुख्यालयात ठेवली आहे, तर विजेत्या संघाला विश्वचषकाची प्रतिकृती दिली जाते. चॅम्पियन संघाला देण्यात येणारा चषकसुद्धा मागील चॅम्पियनच्या नावाला वगळता मुख्य चषकासारखाच आहे.
खरंतर आधी विजेत्या संघाला मुख्य चषक आयसीसीला परत करावा लागत होता, मात्र आता विजेता संघ स्थायी स्वरूपात दिला जाणारा चषक आपल्याकडे ठेवू शकतो. विश्वचषकाची सुरुवात १९७५मध्ये झाली होती, मात्र १९९९मध्ये हा चषक स्थायी स्वरूपात देण्यात येऊ लागला. याआधी जेव्हा कधी नवा प्रायोजक मिळाला, तर चषकसुद्धा बदलण्यात येत होता. आयसीसीनेसुद्धा फिफाच्या तर्हेने पहिल्यांदा १९९९ मध्ये स्वतःचा चषक तयार केला आणि विजेत्या संघाला तो देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या तीन विश्वचषकांचे प्रायोजक पूडेंशियल कंपनी होती. त्यामुळे त्या चषकाला पूडेंशियल चषक म्हटले जात होते. त्यानंतर १९८७ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानने विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद स्वीकारले तेव्हा रिलायन्स हा मुख्य प्रायोजक होता. त्यामुळे या चषकाचे नाव रिलायन्स चषक असे नाव पडले होते. अशाच तर्हेने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये १९९२ मध्ये झालेल्या विश्वचषकाला बेंसेन ऍण्ड हेजज विश्वचषक आणि याच्या चार वर्षानंतर १९९६ मध्ये भारतीय उपखंडात खेळले गेलेल्या स्पर्धेला विल्स विश्वचषक अशा नावाने ओळखले जाऊ लागले होते. आयसीसीच्या या स्पर्धेचे आतासुद्धा अनेक प्रायोजक आहेत, मात्र त्यांची नावे चषक किंवा विश्वचषकाशी जोडले जात नाही. आता या स्पर्धेला आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि चषकाला आयसीसी चषक म्हटले जाते.