Saturday, April 23, 2011

सचिन तुझ्या वाढदिवसानिमित्ताने...


विश्वविजत्या संघाचा सदस्य असल्याचा अभिमान बाळगणारा आंतरराष्ट्रिय कारकीर्दीतील चमकदार २१ वर्षे पूर्ण करणारा विश्वविक्रमादित्य, वंडरबॉय सचिन तेंडुलकर उद्या आपल्या ३८ व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. विश्वविजेत्या संघाचा सदस्य झाल्यानंतर येणारा हा सचिनचा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे आधी झालेल्या वाढदिवसांच्या तुलनेत या वाढदिवसाचा गोडवा काही वेगळाच असणार आहे. सचिनने कराची येथे १५ नोव्हेंबर १९८९ रोजी सुरु झालेल्या कसोटी सामन्यामधून आंतराष्ट्रिय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने १७७ कसोटी सामन्यात ५६.९४ च्या सरासरीने १४६९२ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने ५१ शतके आणि ५९ अर्धशतके झळकाविली आहेत. तर ४५३ एकदिवशीय सामन्यात ४५.१६ च्या सरासरीने १८११ धावा फटकाविल्या आहेत. यामध्ये त्याने ४८ शतके तर ९५ अर्धशतके झळकाविली आहेत. त्याने एकूण ९९ शतके आणि १५४ अर्धशतके साजरे केले आहेत. एवढेच नव्हेतर तो सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या चौथ्या पर्वात सामने खेळत धावांसमवेत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने सुरुवातीपासून ऑरेज कॅप आपल्या कडेच राखली होती. मात्र एकाधावाने पंबाजच्या वल्थॅटीने ती आपल्याकडे घतेली आहे. एवढे करुनही त्याची धावांची भूक क्षमलेली दिसत नाही. यावेळीही त्याला आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम लांबणीवर टाकावा लागण्याची शक्यता वाटते कारण त्याच्या वाढदिवशीच मुंबईला डेक्कनविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याने यावेळी जर मुंबईला आयपीएलच्या चौथ्या सत्राचे अजिंक्य ठरविलेतर ही एक त्याच्या चाहत्यांनाच भेट असेल. त्याला आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. कधी टेनिस एल्बोने पाठीच्या दुखण्याने तर कधी इतरांच्या टीकेने त्याला बेजार व्हावे लागले. मात्र सचिनने कधीही असभ्य वर्तवणुक केली नाही. शरीराच्या त्रासावर मात करीत त्याने कारकिर्दीकशी अधिक फुलेल याकडे लक्ष दिले. तर अनेकांच्या टीकांना त्याने नेहमीच आपल्या बॅटने प्रत्त्युत्तरे दिली आहेत. भारतीय क्रिकेटरसिंकांच्या गळ्यातील ताईत आणि क्रीडा रसिकांच्या दृष्टिने जणू देवच असणार्‍या सचिनचे क्रिकेटसाठीचे असणारे योगदान महत्वाचे आहे. आपल्या या क्रिकेट कारकर्दित सचिनने अनेक विक्रम आपल्या नावार नोंदविले आहेत. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. सचिनला १९९८ साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या राजीव गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याने आपल्या कर्तृत्वाने क्रीडा क्षेत्रातून देशाचे नाव उज्वल कले आहे. वाढत्यावयानुसार त्याची खेळी अधिकाधिक बहरताना दिसते आहे. त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखावे आणि तमाम क्रिकेटरसिंकांना आपल्या खेळी सतत आनंद देत राहावे हीच अपेक्षा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment