एकीकडे भारत महासत्ता होण्याकड़े वाटचाल करत असताना दुसरीकडे त्याच भारतात शेळया-मेंढ्याप्रमाणे मुस्लिम महिलांना वागणूक देण्याचा निर्णय देवबंदच्यानुसार लावण्यात आला, हे ऐकून धक्काच बसला. फतव्यानुसार महिलांची मिळकत कुटुंबीयांनी स्विकारू नये. मुस्लिम महिलांनी पुरुषांबरोबर काम करणे बेकायदा असल्याचे म्हटले आहे. दारुल उलूम देवबंद या मुस्लिम संघटनेने पुन्हा एकदा फतवा काढत मुस्लिम समाजावर बंधने लादली आहेत. त्यामुळे फतवा म्हणजे बेबंदशाही आणि हुकुमशाही म्हणतात ती हीच का? असे म्हणावेसे वाटते.
अहो, आपल्या देशाला भूगोलाच आहे, इतिहास नाही असे म्हणावे लागेल, जर इतिहासाचा परिचय असता तर असे फतवे निघाले असते का? महिलांचा उद्धार व्हावा यासाठी भारतात अनेक थोर मंडळीनी जीवाचे रान केले. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणारया इंग्रजांच्या राजवटीत स्रीयांची सती जाण्याची प्रथा राजाराम मोहनरॉय यांनी बंद करत त्यांना आपला जगण्याचा अधिकार मिळवून दिला। महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्रीयांच्या उद्धारासाठी हयात असेपर्यंत कार्य केले. त्यांनी स्रीयांसाठी आपल्या देशात शिक्षणाचे दरवाजे खुले केले. आणि स्रीयांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार बहाल केला. सावित्रीबाई फुले यांनी कितीतरी दुखद यातना भोगून कितीतरी संकटांना तोंड देऊन मान अपमान सहन करून मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्यांनी अहोरात्र स्रीयांसाठी कार्य केले. म्हणून त्यांना स्रीयांचे उद्धारकर्ते म्हणतात. छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राजवटीत स्रीयांना आरक्षण दिले. मुलींसाठी शाळा , वसतीगृहे निर्माण केली. त्यांना समानतेचा दर्जा दिला म्हणून तर त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही स्रीयांसाठी, मुलींसाठी अविस्मरणीय असे कार्य केले. संत तुकाराम आणि गाडगे महाराज यांनी आपल्या अभंगातून आणि कीर्तनातून स्रीयांसाठी कार्य केले. या सर्वांच्याच मेहनतीचे फलितच, आज अनेक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना दिसत आहे. त्या आपल्याला अनेक विभागात काम करताना दिसतात. रिक्षा चालिकापासून ते वैमानिकांपर्यंत, शिपयापासून ते अधिकार्यांपर्यंत, शिक्षिकेपासून ते मंत्र्यांपर्यंत, आज अनेकींनी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, आय.पी.एस.सारख्या उच्च नामांकित पदांवर आपला जम बसविला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या देशाचा पूर्ण कारभारही एक महिलाच पाहत आहे. कदाचित अमानुष फतवा काढणार्यांणा
याचा विसर पडला असावा. स्री-पुरुष समानता असलेल्या भारतात मुस्लिम समाजातील महिलांवर या फतव्यामार्फ़त लादण्यात येणारा निर्णय महिलांवर अत्याचार करण्यासारखा आहे. स्रीयांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करताना किंवा बोलताना ठराविक अंतर ठेवावे. त्यांनी कमाविलेला पैसा हा त्या कुटुंबासाठी हरामाचा पैसा असेल. हे म्हणजे स्रीयांची गळचेपी करण्यासारखे आहे. फतवा काढणार्यांणा कदाचित परिस्थितिचे चटके बसलेले नसावेत.
आज अशी कित्येक घरे आहेत की, त्या घरात केवळ एकाच्याच मिळकतीतून कुटुंब चलाविणे अशक्य आहे. कित्येक घरे अशी आहेत की, स्रीयांच्याच मिळकतीवर आधारलेले आहे. कुटुंबातील कमावता पुरुष जर घरच्या सर्व गरजा पुर्ण करण्यास असमर्थ ठरत असेल तर काय करणार? उपाशीच राहाणार का ? आज महागाई इतकी वाढलेली आहे की एकाच्याच मिळकतीतून घर चलाविणे म्हणजे कमी पाण्यात होडी चालविण्यासारखे आहे. आशा परिस्थितीत जर स्रीयांनी मिळकतीसाठी हातभार लावला तर काय वाईट आहे. असे मला वाटते. (काम केलेच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नसावे, या बाबतचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा असावा.) लहान वयात शिक्षणासाठी शाळेत पाठवायच आणि मोठे झाल्यावर त्यांच्यावर अशाप्रकारच्या जाळ्यात अडकवत चार भिंतीत राहण्याची बंधने लादायची याला काय अर्थ आहे. अशाने प्रगति तर नाहीच पण अदोगती होणार यात अजीबात शंका नाही.
कामावर रुजू झाल्यावर अनेकांशी चर्चा होणारच. अशातच काम करत असलेल्या मुस्लिम महिलांना फताव्यानुसार वागण्यास अगदीच जड़ जाईल. मानव हा समाजशील प्राणी आहे. समाजात वावरताना तो अनेकांशी नाते- संबंध जोडत असतो. त्यामुळे ठराविक अंतरावरून, पडद्या आडूनच किंवा पुरुषांच्या बरोबरीने काम न करने हे केसाने गळा कापण्यासारखे आहे. 'प्रगति केवळ पुरुषांचीच आणि स्रीया पुन्हा चुल आणि मूल पुरत्या मर्यादित' अशी अवस्था भारताच्या होणार्या प्रगतीला मोठा अड़थळा निर्माण करू शकते, असे वाटते. तसेच देशाच्या प्रगतीचा समतोल ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळकत मोठी असेल तरच विकास करणे शक्य आहे. शरियातिच्या कायद्याचे पालन न करानार्यांस अल्लाच्या दरबारात त्रास नक्कीच होइल, असे काही मंडळींकडून सांगण्यात येते. कदाचित असेलही, पण तो त्रास नंतर होणारा असेल, आधी होणार्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे त्याचे काय? यावर या संगठणांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल.
समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वांवर आधारित भारतीय राज्यघटना त्यावेळी कोट्यावधी लोकांनी मान्य केली असून आज अब्ज्यावधी लोकांना मान्य आहे असे असताना लोकशाही असलेल्या या देशात कोणीही उठतो आणि फतवे काढून हुकूमत गाजवत असतो. धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही. कोणत्याही धर्मापेक्षा देश मोठा असतो, म्हणून धर्म देशापेक्षा मोठा मानू नये. इतकेच धर्म वेडेपणा असाल तर धर्म हा केवळ घरापुरता मर्यादित ठेवावा. भारत देश संपूर्ण जगात अधिराज्य करणारा, महासत्ता होणार अशी आशा करत असताना या देशात काय चालले आहे, याकडे राजकारण्यांनी वेळ काढून विचार करावा.
आशाप्रकारचे फतवे काढणार्याँना देशाची राज्यघटना कळत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करावा. जर त्यांना राज्यघटनाच मान्य नसेल तर लोकशाही प्रधान देशात त्यांना असे हुकुमशाहीचे जुल्मी फतवे काढण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांच्या धर्माचे स्वतंत्र कायदे असले तरी त्यांना याचे भान असायलाच हवे की, आपण भारतासारख्या देशात आहोत, ज्या देशात स्रीयांसाठी अनेकांनी अथक प्रयत्न केलेला इतिहास आहे. भारताकडे इतर देशांचा बघण्याचा दृष्टिकोण हा आदराचा आहे. या देशात स्री - पुरुष समानता आहे, असे असताना आशा या फताव्यासारख्या कृत्यामुळे देशाच्या प्रतिमेस धक्का तर लागत नाहिना याची जाणीव ठेवणे आवश्यक होते. ते जर जाणीवपूर्वक असे कृत्य करत असतील तर आशा प्रकारचे फतवे काढणार्यांना देशातून हाकलून देण्याशिवाय दूसरा पर्यायच उरणार नाही. भारताची प्रतिमा डागळवण्याचा प्रयत्न करणार्यांना भारतवाशी कधीच माफ़ करणार नाही तरच भारत प्रजासत्ताक आणि महासत्ताक होइल.
Saturday, May 22, 2010
Thursday, May 20, 2010

Thursday, May 13, 2010
चैम्पियन ऑफ चैम्पियनसपर्यंतचा प्रवास
भारतातील प्रत्येक खेळाला एक स्टार लाभलेला आहे। क्रिकेट म्हटल की सचिन तेंडुलकर, बुद्धिबळ म्हटल की विश्वनाथन आनंद, फुटबाल म्हटल की बायचुंग भूतिया, बडमिंटन म्हटल की सायना नेहवाल, म्हटल की पी टी उषा आणि शरीरसौष्टवपटू म्हटल की सर्वांच्याच मुखातून नाव उच्चारले जाते ते चैम्पियन ऑफ चैम्पियन सुहास खामकरचे. या पठ्याने एक दोन नव्हे तर तब्बल चार वेळा 'भारत श्री' तिन वेळा 'महाराष्ट्र श्री' त्याची भारतीय संघात आरनल्ड क्लासिकमध्ये प्रथमच निवड झाली आहे. या शरीरसौष्टवपटूने नुकतेच शिवाजी पार्क येथे झालेल्या स्पर्धेत 'महाराष्ट्र श्री', 'पराग श्री', 'लोकाधिकार श्री' किताब पटकविले आहेत. आता त्याचे पुढचे लक्ष्य आहे ते मिस्टर ओलिम्पियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे.
शरीराने दुबळया असनार्या सुहासला लहानपणी शरीरसौष्टवपटूचे शरीर इतके बलाढ्य असते हे पाहून देखिल त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. परंतु त्याने स्वता जेव्हा या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा आपणही अशीच बलाढ्य देहयष्टी करू शकतो याची जाणीव झाल्याचे त्याने म्हटले आहे.
सुहास हा मुळचा कोल्हापूरचा. त्याचे वडिल मधुकर खामकर आणि भाऊ सुधीर खामकर हेही पहेलवानकी करायचे, असे असताना सुहासनेही घरची परंपरा अशीच पुढे चालवावी असा आग्रह त्याच्यावर कधीच लादण्यात आला नव्हता. एवढेच नव्हे तर त्याने वकील, इंजिनीअर , डॉक्टर, आयपीएस आशा अपेक्षाही त्याच्यावर लादण्यात आल्या नव्हत्या. कोल्हापुरचे वातावरण त्यावेळी पहेलवानकीने भरलेले होते. इतरांप्रमाने आपल्याही शरीराला बळकटी मिळावी आणि आपले शरीरही बलाढ्य व्हावे यासाठी त्याने प्रथम महानगर पालिकेच्या राजारामपुरी व्यायाम शाळेत सरावाला सुरुवात केली। तेथील स्थानिक शरीरसौष्टव स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक पटकविला. त्यामुले घरातल्या माणसांनी त्याच्याकड़े यासंदर्भात बरेच लक्ष्य दिले. आणि यामुलेच मी या क्षेत्रताच करिअर घडवायच मनोमन ठरविल्याचे त्याने म्हटले आहे. कोल्हापुरातील विभीषण पाटिल व्यायाम शाळेत जोरदार सरावास सुरुवात केली. सुहासने तेथे सहा सात वर्षे सरावात सातत्य राखले. त्यादरम्यान तो जिल्हापातळीवर व पश्चिम महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा शरीरसौष्टवपटू ठरला. सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे अनेक स्पर्धा जिंकल्याचे तो सांगतो. कोल्हापुरातील शाहू साखर कारखान्याचे मालक विक्रमसिंह घाडगे यांनी आर्थिक मदत सुरु केली. आणि व्यायामासाठी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. सुहासने मुंबईला आल्यावर स्वतः निवडलेल्या या क्षेत्रात जिद्द पणाला लावून अनेक स्पर्धांवर वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे पोलिस, नेव्ही, एअरफाॅर्स, आर्मी, रेल्वे आणि बँक यांची सुहासकड़े रांग लागली ती आमच्या बाजूने खेळावे यासाठी. त्याने विचाराअंती निवड केली ती रेल्वेची. चांगली सर्विस मिळाल्यानंतरही तो थंडावला नाही. त्याने रेल्वेच्या वतीने खेळताना राष्ट्रीय पातळीवर पाच पदके जिंकली आहेत जी आतापर्यंत रेल्वेसाठी कोणीही जिंकलेली नाहीत. दिवसातून सात तास सराव करणार्या सुहासने प्रेमचंद डोगरा आणि महाराष्ट्राचे प्रकाश करंडे यांना आपले आदर्श मानले आहे. आतापर्यंत मिळविलेल्या यशाचे श्रेय तो आपले आई, वडिल, भाऊ, पत्नी, मित्र आणि स्पोंनसरशिप देणारे यांना देतो. तसेच बरेच जण कमी वेळात जास्त प्रगती करण्यासाठी शोर्टकचा वापर करीत असतात, त्यामुळे तो या क्षेत्रात प्रवेश करणार्यांना संदेश देतो की, ' सरावात प्रयत्न आणि चिकाटी जर सातत्याने राखली तर यश मिळते. त्यामुळे शोर्टकट न वापरता जिद्द पणाला लावा'.
भारताचा तिरंगा या खेळाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर फडकविण्याची महत्वकांक्षा असल्याचेही त्याने म्हटले आहे. 'मला जर जागतिक पातळीवरचे चांगले प्रशिक्षक मिळाले तर मी अव्वल दर्जाचा शरीरसौष्टवपटू ठरू शकतो. तसेच प्रायोजक मिळाले तर अधिक जोरदार सराव होऊ शकतोअसे त्याने म्हटले आहे.
गोवा येथील मडगाव येथे झालेल्या राष्ट्रिय शरीरसौष्टवपटू चैम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच चैम्पियन ऑफ चैम्पियनसचा किताब पटकविला आहे. त्याने या खेळाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताचा तिरंगा फडकवावा हीच अपेक्षा.
भारतातील प्रत्येक खेळाला एक स्टार लाभलेला आहे। क्रिकेट म्हटल की सचिन तेंडुलकर, बुद्धिबळ म्हटल की विश्वनाथन आनंद, फुटबाल म्हटल की बायचुंग भूतिया, बडमिंटन म्हटल की सायना नेहवाल, म्हटल की पी टी उषा आणि शरीरसौष्टवपटू म्हटल की सर्वांच्याच मुखातून नाव उच्चारले जाते ते चैम्पियन ऑफ चैम्पियन सुहास खामकरचे. या पठ्याने एक दोन नव्हे तर तब्बल चार वेळा 'भारत श्री' तिन वेळा 'महाराष्ट्र श्री' त्याची भारतीय संघात आरनल्ड क्लासिकमध्ये प्रथमच निवड झाली आहे. या शरीरसौष्टवपटूने नुकतेच शिवाजी पार्क येथे झालेल्या स्पर्धेत 'महाराष्ट्र श्री', 'पराग श्री', 'लोकाधिकार श्री' किताब पटकविले आहेत. आता त्याचे पुढचे लक्ष्य आहे ते मिस्टर ओलिम्पियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे.
शरीराने दुबळया असनार्या सुहासला लहानपणी शरीरसौष्टवपटूचे शरीर इतके बलाढ्य असते हे पाहून देखिल त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. परंतु त्याने स्वता जेव्हा या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा आपणही अशीच बलाढ्य देहयष्टी करू शकतो याची जाणीव झाल्याचे त्याने म्हटले आहे.
सुहास हा मुळचा कोल्हापूरचा. त्याचे वडिल मधुकर खामकर आणि भाऊ सुधीर खामकर हेही पहेलवानकी करायचे, असे असताना सुहासनेही घरची परंपरा अशीच पुढे चालवावी असा आग्रह त्याच्यावर कधीच लादण्यात आला नव्हता. एवढेच नव्हे तर त्याने वकील, इंजिनीअर , डॉक्टर, आयपीएस आशा अपेक्षाही त्याच्यावर लादण्यात आल्या नव्हत्या. कोल्हापुरचे वातावरण त्यावेळी पहेलवानकीने भरलेले होते. इतरांप्रमाने आपल्याही शरीराला बळकटी मिळावी आणि आपले शरीरही बलाढ्य व्हावे यासाठी त्याने प्रथम महानगर पालिकेच्या राजारामपुरी व्यायाम शाळेत सरावाला सुरुवात केली। तेथील स्थानिक शरीरसौष्टव स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक पटकविला. त्यामुले घरातल्या माणसांनी त्याच्याकड़े यासंदर्भात बरेच लक्ष्य दिले. आणि यामुलेच मी या क्षेत्रताच करिअर घडवायच मनोमन ठरविल्याचे त्याने म्हटले आहे. कोल्हापुरातील विभीषण पाटिल व्यायाम शाळेत जोरदार सरावास सुरुवात केली. सुहासने तेथे सहा सात वर्षे सरावात सातत्य राखले. त्यादरम्यान तो जिल्हापातळीवर व पश्चिम महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा शरीरसौष्टवपटू ठरला. सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे अनेक स्पर्धा जिंकल्याचे तो सांगतो. कोल्हापुरातील शाहू साखर कारखान्याचे मालक विक्रमसिंह घाडगे यांनी आर्थिक मदत सुरु केली. आणि व्यायामासाठी मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. सुहासने मुंबईला आल्यावर स्वतः निवडलेल्या या क्षेत्रात जिद्द पणाला लावून अनेक स्पर्धांवर वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे पोलिस, नेव्ही, एअरफाॅर्स, आर्मी, रेल्वे आणि बँक यांची सुहासकड़े रांग लागली ती आमच्या बाजूने खेळावे यासाठी. त्याने विचाराअंती निवड केली ती रेल्वेची. चांगली सर्विस मिळाल्यानंतरही तो थंडावला नाही. त्याने रेल्वेच्या वतीने खेळताना राष्ट्रीय पातळीवर पाच पदके जिंकली आहेत जी आतापर्यंत रेल्वेसाठी कोणीही जिंकलेली नाहीत. दिवसातून सात तास सराव करणार्या सुहासने प्रेमचंद डोगरा आणि महाराष्ट्राचे प्रकाश करंडे यांना आपले आदर्श मानले आहे. आतापर्यंत मिळविलेल्या यशाचे श्रेय तो आपले आई, वडिल, भाऊ, पत्नी, मित्र आणि स्पोंनसरशिप देणारे यांना देतो. तसेच बरेच जण कमी वेळात जास्त प्रगती करण्यासाठी शोर्टकचा वापर करीत असतात, त्यामुळे तो या क्षेत्रात प्रवेश करणार्यांना संदेश देतो की, ' सरावात प्रयत्न आणि चिकाटी जर सातत्याने राखली तर यश मिळते. त्यामुळे शोर्टकट न वापरता जिद्द पणाला लावा'.
भारताचा तिरंगा या खेळाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर फडकविण्याची महत्वकांक्षा असल्याचेही त्याने म्हटले आहे. 'मला जर जागतिक पातळीवरचे चांगले प्रशिक्षक मिळाले तर मी अव्वल दर्जाचा शरीरसौष्टवपटू ठरू शकतो. तसेच प्रायोजक मिळाले तर अधिक जोरदार सराव होऊ शकतोअसे त्याने म्हटले आहे.
गोवा येथील मडगाव येथे झालेल्या राष्ट्रिय शरीरसौष्टवपटू चैम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच चैम्पियन ऑफ चैम्पियनसचा किताब पटकविला आहे. त्याने या खेळाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताचा तिरंगा फडकवावा हीच अपेक्षा.
Subscribe to:
Posts (Atom)